Saturday, 22 December 2012

हा अजून एक बलात्कार आहे.....



आज वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाणीवर सगळया काही बलात्काराच्याच बातम्या ..... असे वाटते कि जणू काही आजच खूप मोठे बलात्कार होत आहेत.... आणि ह्या वरती तरुण तुर्क आणि म्हातारे .. त्यांचे काही विचार, मतं मांडत आहेत... काय करावे आणि काय करू नये याच्यावरतीच आमची अजूनही लढाई सुरु आहे.... सगळ्या डोक्याचाच बलात्कार झालाय...अश्यातच आज ऑफिसमधील एक प्रिंटआऊट वाचनात आली. खूप मस्त लिहिलं होत, जरा तुमच्यापर्यंतपण पोहचउ वाटलं म्हणून पहा वाचून......


सत्तर वर्षाच्या आजीला 
कोर्टाच्या पायरीवर उभी असलेली बघून 
मी तिला विचारलं 
आजी तुम्ही इथं कशा 
आजी मला म्हणाली 
बाबा,सतराव्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला 
होता आज त्याचा निकाल आहे.

३२ न्यायाधीश २० वकील 
४० शिरस्तेदार बदलून गेले 

निम्मे आरोपी मरून  गेले 
बाकीचे केंव्हाच पळून गेले 

तरीही मी जिवंत आहे 
हीच एक कमाल आहे.

सतराव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा 
आज निकाल आहे 

भगवान के घर दर है,
हि म्हण जराही बदलली नाही,
न्यायदेवतेची पट्टी जरासुद्धा सरकली नाही,
आंदोलने तेंव्हापण झाली 
नंतर कुणी फिरकलं नाही,
तरीही वाटतं  जीवनाची आज सकाळ आहे
सतराव्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज निकाल आहे.

थरथरत्या हाताला धरून म्हातारीला उभं केलं 
निकाल ऐकण्यासाठी चार भिंतींच्या आत नेलं 
निकाल ऐकुण म्हातारीचे पाय लटपटू लागले 
पुराव्या अभावी निम्मे आरोपी निर्दोष सुटले 
ज्यांना शिक्षा झाली ते तर कधीच मरून गेले 

सत्तर वर्षाच्या आयुष्याचा हा सारा निकाल आहे 
सतराव्या वर्षी झालेल्या बालात्कारावर 
न्यायालयाचा हा अजून एक बलात्कार आहे.

                                    - कवी प्रकाश पाठारे. 

Sunday, 16 December 2012

" नादब्रम्ह "



पटत नाही मनाला, कि आजही अशी माणसे आहेत कि ज्यांच्यामुळे आपण साक्षात ईश्वराला भेटू शकतो. खरंच संगीतात इतकी जादू असते कि आपण कधी त्यात तल्लीन होऊन जातो हेच कळत नाही. " नादब्रम्ह " काय असतं हे आज उमगल. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव यात आज संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा याचं वादन ऐकत असताना जणू ईश्वर आपल्याला भेटल्याचा आनंद होतो. आणि याच ईश्वराबरोबर बोलण्यात किंवा आपल्या भावना त्या ईश्वरापर्यंत पोहोचवण्यात संगीतात खूप ताकद असते. आजकाल मंदिरातहि जाऊन जी मनःशांती मिळत नाही ती या महोत्सवात मिळाली. जिथे रसिक आणि संगीतांचे देव यांचे मिलन होते. ज्या प्रकारे पंडितजी रसिकांना आपल्या वादनात तल्लीन ठेवतात आणि जसजसा संगीताचा स्वर वाढत जातो तसतशी ईश्वराला भेटण्याची त्यात गुंग होण्याची चढाओढ होत राहते.
     खरं तर संज्ञापनाची पदवी घेत असतांना संज्ञापन, जनसंज्ञापन काय आणि कसं असतं हे शिकलो. पण बोधनशास्त्रानुसार पंडितजींच वादन ऐकत असताना अस जाणवलं कि संज्ञापन किंवा जनसंज्ञापन हे या मार्गाने खूप उत्तम प्रकारे होऊ शकते. 
     मला संगीतातलं फारस कळत नाही. पण ज्या प्रकारे आपण ते मन लावून  ऎकतो तसा त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होतो. कितीतरी वेळाचे मनन, चिंतन केल्याचे फायदे एकत्र एकाच वेळी होतात. आज ज्याप्रकारे तरुण पिढी D.J. च्या तालावर नाचत भरकटत चालली आहे. अश्या तरुणांना ह्या महोत्सवाद्वारे आत्मशुद्धी करून घेण्याची हि एक चांगली संधी होती.  

Sunday, 2 December 2012

माझे विचार, माझे लेखन...

मित्रांनो जर तुम्हाला माझे विचार, माझे लेखन वाचायचे असतील . तसेच त्यावर आपला अभिप्राय नोंदवायचा असेल किंवा एखादी टिपण्णी करायची असेल तर मला http://rohitbhise.blogspot.in/ या blog  वरती follow करा. ( यासाठी मला marks सुद्धा आहेत बरं का)

Please
http://rohitbhise.blogspot.in

पुन्हा लिखाणाला प्रारंभ......

अस वाटत कि बहुतेक  या थंडीच्या दिवसात माझे विचार गोठले का शब्द गारठले हेच काळात नाही. मनात खूप काही असत पण ते व्यक्त करता येत नाही. एखादा चांगला मार्ग मिळावा आपले विचार प्रकट होण्यासाठी, एक सुरुवात हवी आहे. एक सुरुवात जी करेल माझे मत व्यक्त या लिखित मार्गाने. खूप झालं  निश्चय करून. आता प्रारंभ करायला हवा नव्याने, पुन्हा त्याच जोमाने कामाला लागायला हवे. थोडं थोडं का होईना लिहिलं गेल पाहिजे. यासाठी आजपासूनच लिखाणाला सुरुवात करतो आहे. आज माझा पुन्हा लिखाणाला प्रारंभ......